*(मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टें, गारअकोले, आलेगाव बु. येथे भेटी दिल्या..)*


अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून  शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले..

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देत आज सकाळपासून आमदार पाटील हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरकारकडे सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.