पंढरपूर(प्रतिनिधी):- स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिन तथा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वारकरी भाविक भक्तांना मिष्ठान्न व लाडू वाटप करण्यात आले.
स्वाभिमानी मराठा महासंघाने महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये समाज कार्य करणाऱ्यांचा गौरव करून तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवून स्वाभिमानी मराठा संघ वाढवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. आज पाचवा वर्धापन दिन असून तो मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे.
स्वाभिमानी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांनी पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी चौकामध्ये पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून घोषणा दिल्या तसेच वारकरी भाविकांना समाज बांधवांना बुंदीचे लाडू वाटप करून हा आनंदाचा सोहळा शहरातच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक घरात गोड केला पाहिजे असे आवाहन केले.
स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिन संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी मराठा संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील,
सांगोला तालुकाध्यक्ष काकासाहेब पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल बागल, छावा संघटना पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रणव शिंदे, आतिश वाघमारे, अवधूत गडकरी, नागेश राऊत, प्रदीप परचंडे,लखन घाडगे यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
0 Comments