LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अभिजीत पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये यावे


विठ्ठल कारखान्याप्रमाणे नगरपालिका निवडणूकीचे नेतृत्व करा-दत्तात्रय बडवे-शिंदे

पंढरपूर -  एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत गोरगरीब सामान्य जनतेचे कल्याणाचे विचार ऐकले व आपली डीव्हीपी उद्योग समुहाची 170 लोकांची टीम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून ऐकले आणि त्यांचे विचार सामाजिक नेतृत्व करताना कोणत्या विचारसरणीचा विचार करून समाजकारण करावे हे आपल्या विचारावरून दिसून आले. यावरून आपले विचार प्रति सुधाकरपंत परिचारक यांच्याप्रमाणे बंद पडलेल्या कारखान्याचे डॉक्टर असल्याचे आपल्या कार्यावरून दिसून येते. कार्यकर्ता निरव्यसनी असावा व संस्थेतील कर्मचारी काम करताना सार्वजनिक हिताचे भान असलेला कर्मचारी असावा की जेणेकरून सहकार क्षेत्रातील संस्था जनतेच्या हिताच्या असाव्यात व त्या कायमस्वरूपी चालू राहिल्या पाहिजेत. असे विचार आपले असल्यामुळे आपण विठ्ठल कारखान्याप्रमाणेच पंढरपूर नगरपालिका निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करावे व येणाऱ्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे बहुमत आणून नगरपालिका उत्तमरितीने चालवून आर्थिकदृष्टया सबळ होण्यासाठी प्रयत्न करावेत.

 मागील काही दिवसांपूर्वी नगरपालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेली आहे अशी बातमी वाचली होती. अनेक प्रकारच्या वसूल्या होत नसल्याचे विद्यमान मुख्याधिकारी यांनी कबूल केलेले आहे. मालमत्ताधारक, शॉपिंग सेंटर यांच्याकडून लाखो रूपयांची थकबाकी आहे. नगरपालिका निवडणूकीचे मागील 1 वर्षापासून वातावरण तयार झाले मात्र निवडणूक काही झाली नाही त्यामुळे त्या भागातील लोकप्रतिनिधी वसूलीसाठी कुणी वाईटपणा घ्यावा या भूमिकेतून या थकबाकीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले अशा परिस्थितीत नगरपालिकेची विठ्ठल कारखान्याप्रमाणे अवस्था झालेली आहे. शासनाचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाऱ्याचा पगार होत नाही अशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे. कोणताही कर्मचारी खाते प्रमुख नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रयत्न करताना दिसून येत नाही. तसेच लेट रिव्हीजन सुरू झाल्यामुळे नगरपालिकेला लाखो रूपयांचा फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीमुळे नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी व स्वच्छ प्रशासन निर्माण होण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा व नगरपालिकेची निवडणूक कॉंग्रेसने स्वतंत्रपणे आपल्या नेतृत्वाखाली लढवावी.अशी विनंती सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केलेली आहे.

कारण 2009 पासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली तिर्थक्षेत्र विकास आघाडीबरोबर आम्ही प्रचार कार्य केले व तद्‌नंतर निवडणूका झाल्यावर सत्ता आल्यानंतर व गेल्यानंतरही नुकतीच भगिरथ भालके यांच्या घरी नुकत्याच झालेल्या समविचारी आघाडीच्या बैठकीचे साधे आमंत्रणही देण्यात आले नाही, विश्वासात घेत नाहीत व पालकमंत्री आल्यानंतर कळवत ही नव्हते. आमच्या प्रश्नाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले मार्गी लावले नाहीत. त्यामुळे पंढरपूरच्या कॉंग्रेसला सक्षम नेतृत्वाअभावी मरगळ आलेली आहे. त्यातच माजी तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील यांची जिल्हा कमिटीत रवानगी झाल्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या कॉंग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पंढरपूरच्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळत नाही. तरी ऊर्जेच्या रूपाने अभिजीत पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये यावे व पंढरपूर नगरपालिका निवडणूकीचे नेतृत्व करावे अशी विनंती दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments