सोलापूर शहरातील अत्यंत गजबजलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळे वस्ती या रस्त्याची अत्यंत भयावह अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. नागरीक जखमी होत आहेत, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्यात पाणी साचत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून ये जा करताना या भागातील रहिवासी, शाळकरी मुले, रुग्ण, व्यापारी, दुकानदार यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तरी महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी असे निवेदन सोलापूर शहर काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी साळुंखे यांच्या वतीने मा. नगरसेवक विनोद भोसले, सोमपा परिवहन समिती मा. सदस्य तिरुपती परकीपंडला, विजय बालनकर, संजय गायकवाड, चंद्रकांत पात्रे यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले.
0 Comments