पंढरपूर: - पंढरपूर काही वारकरी संघटनांच्या मागणीनुसार ६५ एकर क्षेत्रा जवळील आणखी ६४ एकर बागायत शेतजमिन आषाढी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी नव्याने संपादीत करण्यासाठी नवीन तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात प्रयत्न सुरू झाल्याने बाधीत शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. त्याचप्रमाणे ४० ते ५० बाधीत शेतकरी, प्लॉटधारक व मठवाले यांनी हरकती प्रशासनाकडे निवेदनाव्दारे पोहचविल्या आहेत.या नवीन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात शेगांव दु. या गावातील ४० ते ५० अल्पभुधारक शेतकरी, पुर्वीचे पुनवर्सीत असलेले धरणग्रस्तांनाही याचा फटका बसणार आहे. याबाबत बाधीत शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, शहराच्या चारही बाजूस भाविकांसाठी तात्पुरती निवासाची व्यवस्था केल्यास एकाच भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्याची गरज पडणार नाही व त्यामुळे अल्पभुधारक शेतकऱ्यांवर संपादनाची कुऱ्हाड कोसळणार नाही.ज्या पध्दतीने बागायत जमिनी संपादीत करण्याचा प्रस्ताव आहे. त्या बरोबरच प्लॉट धारक व वारकऱ्यांचे मठ ही आहेत. ज्यापध्दतीने यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या निवासाची तात्पुरती सोय करण्यासाठी प्रशासन नव्या आराखड्यात कायमस्वरूपी वारकऱ्यांच्या सोईसाठी असणाऱ्या मठांवरही बुलडोजर फिरवण्याच्या तयारीत आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जो ६५ एकर परिसर भाविकांच्या सोयीसाठी तातडीने रस्ते, वीज, पाणी, वृक्ष लागवड करून विकसीत केला परंतू जिल्हाधिकारी मुंढे यांचे बदली नंतर त्या ६५ एकर परिसराची देखभाल करण्यात प्रशासन कमी पडल्याचे दिसून येत आहे. त्याठिकाणी ३६५ दिवसांपैकी ८/१० दिवस भाविक ६५ एकराचा वापर करीत असतात उर्वरीत दिवसात शहरातील तळीराम व काही उडाणटप्पू त्या ठिकाणी जागेचा गैरवापर करीत असल्याचे पहावयास मिळते तर त्या ठिकाणी असणाऱ्या शौचालयाचे दरवाजे, भांडी चोरीस जाण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत.गत आषाढी यात्रेत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ज्या पध्दतीने शहराच्या चारही बाजूस बस स्थानक उभे करून शहरात होणारी गर्दी कमी केली त्याप्रमाणेच पुढील काळतही त्या-त्या बसस्थानका जवळच नव्याने भाविकांसाठी तात्पुरती निवासाची सोय केल्यास शहरातील गर्दीवरही नियंत्रण होईल. प्रशासनाचा ताणही कमी होईल असे बाधीत शेतकऱ्यांचे व वारकरी संघटनांचेही म्हणणे आहे.
0 Comments