LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री साहेब आधी पंढरपुरातील ' हे ' प्रश्न ' सोडवा आणि मग कॉरिडॉर करा ! - गणेश अंकुशराव



पंढरपूर (प्रतिनिधी) : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर ला येऊन गेले, इथे आल्यानंतर त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन येत्या तीन महिन्यांनंतर जमीन अधिग्रहण करून कॉरिडॉर चे काम सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यावर आत्ता पंढरपूर मधील महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी पंढरपुरातील अनेक वर्षांपासून चे रखडलेले प्रश्न सोडवावेत आणि नंतर कॉरिडॉर चे बघावे असे मत व्यक्त केले आहे.

एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, पंढरपूर शहरात सद्यस्थितीत सर्वत्र घाणीचे व धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, खराब रस्ते, पिण्याचे अस्वच्छ पाणी, चंद्रभागा नदी प्रदुषण, उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी, महिला भाविकांसाठी चंद्रभागेच्या पात्रात प्रसाधन गृह नाही, श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन संवर्धनाचे निकृष्ट दर्जाचे कामामुळे विठुरायाच्या मंदिरातील छताची गळती, पांडुरंगाने सोबत आणलेला गोवंश धोक्यात आहे, वारकरी भाविकांसह पंढरपूर शहरातील नागरिकांच्या गैरसोयी असे अनेक प्रश्न पंढरपुरमध्ये जैसे थे आहेत. यापैकी एकही प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी पंढरपुर मध्ये आल्यावर चक्कार शब्द काढला नाही, परंतु स्थानिक नागरिकांचा प्रखर विरोध असुनही पंढरपूर कॉरिडॉर चं काम रेटून सुरू करण्यासाठी अट्टाहास सुरु आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी आधी पंढरपुरातील वरील प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि मग नंतर कॉरिडॉर चं बघावं. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.

..............................................

मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

कळावे आपला 
- गणेश अंकुशराव 
- मोबाईल - 9370271730

Post a Comment

0 Comments