सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर व ईतर पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. परंतु त्या दरम्यान जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ व द .सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता व नंतर हा विजपुरवठा ३ तासावर करण्यात आला .परंतु ह्यामुळे नदीला पाणी असुनही नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊभे पीक धोक्यात आले होते. याची तात्काळ दखल खा. प्रणिती शिंदे यांनी घेऊन जिल्हाधिकारी श्री. कार्तिकेयन साहेब यांच्याकडे विजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली. त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन विजपुरवठा पुर्ववत करण्यासंदर्भात महावितरण कंपनीला आदेश देण्यात आले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments