LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय संघाला मोठा धक्का, तीन खेळाडू संघाबाहेर


 

पंढरपूर/ मुंबई  : भारत विरुद्ध आफ्रिया ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यापूर्वी भारताचे तीन खेळाडू संघाबाहेर गेले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका भारताने खिशात घातली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ घरच्या मैदानावर दुसरी ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरोधात ट्वेन्टी-२० मालिका होणार असून, भारतीय संघ देखील जाहीर झाला होता. तर, मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघही भारतात दाखल झाला आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचे तीन स्टार खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. त्यामुळे संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तीन खेळाडू बाहेर गेल्याने कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे, तर गोलंदाज मोहम्मद शमी करोनाची लागण झाल्यामुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. तसेच, खेळाडू हार्दिक पांड्याला बीसीसीआयने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन बाहेर, तीन आतमध्ये

हार्दिक पांड्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदला संघात घेण्यात आलं आहे. दीपक हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यर तसेच, मोहम्मद शमीच्या बदल्यात उमेश यादवला संधी मिळाली आहे. उमेश यादव तिरूअनंतरपुरमला संघासह पोहचला आहे.

Post a Comment

0 Comments