यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की, बाहेरगावावरुन येवून भंडीशेगांव ता.पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असणारे श्री कदम हे स्वत:च्या शेतामध्ये द्राक्ष पिकांवर विविध प्रयोग करुन अल्प पाण्यामध्ये तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे सातत्याने ते प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कामाबरोबर भागातील इतरही शेतकऱ्यांना ते द्राक्ष पिकांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीत असून अल्प जमीन असवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन केल्यामुळे तालुक्यातील बहुतांष शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे असेही काळे यांनी सांगीतले.
या सत्कार समारंभास प्रगतशिल द्राक्ष बागायतदार चंद्रकांत कोळवले व त्यांचे सहकारी, तसेच वसंतबागचे व्यवस्थापक शहाजी काळे, देवानंद वाघमारे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments