LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आता प्रहार संघटना आमदारांच्या घरासमोर 11 एप्रिलला रात्री बाराला पेटवणार स्मशालपंढरपूर/ संतोष मोरे


शेतकर्यांचे शेतीचे कर्ज माफ करून शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांची कर्जमाफी नाहि तर कर्ज भरणाच्या सूचना वजा दमच दिला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असुन प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता आमदारांच्या घरासमोर स्म शाल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बच्चूकडू यांनी केले आहे. सोलापूर जिल्हा ऊस पट्टयाचा बालेकिल्ला समजला जातो व शेतकर्यांचे कोणतेही आंदोलन याच सोलापूर जिल्ह्यातून आक्रमक होत असतात त्यामुळे आता सोलापूर जिल्हातील शेतकरी कितपत या आंदोलनात सहभागी होतात हे पहावे लागणार आहे. महायुती सरकारने सत्तेवर येण्या अगोदर 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आली पण आता उपमुख्य मंत्री यांना शहाणपन सुचले आणि शेतकर्यांना कर्ज माफि नाहि असा दम चं दिला. त्यामुळे आता शेतकर्यांनी आपली एकजुट दाखवून आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. पंढरीच्या विठ्ठलाच्या नगरीत मात्र हे आंदोलन आक्रमक होणार असल्याचे यावेळी प्रहार कडून सांगण्यात आले. शेतकर्यां च्या कोणत्याहि आंदोलनाची सुरुवात पंढरीच्या विठुमाऊली च्या दर्शनाने होते. यावेळीही रात्री बाराला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीच्या आमदाराच्या घरासमोर स्मशाल पेटवून आक्रमक आंदोलन होणार हे मात्र निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments