आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील EVM घोटाळा आणि विविध विषयासंदर्भात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत भाजपने षडयंत्र करून जिंकले म्हणून राहुलजी गांधी यांनी एक लेख लिहून भाजपला उघडे पाडले. निवडणुकीतील सत्य परिस्थिती लोकांसमोर निदर्शनाला आणले. निवडणूक आयोगाला जाब विचारले असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता त्याचे उत्तर भाजपवाले आणि मुख्यमंत्री फडणवीस हे फसवे आकडेवारी देत उत्तर देत आहेत. मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली याचे उत्तर देत नाही, CCTV फुटेज विचारले असता नरेंद्र मोदींनी कायदाच बदलून टाकला आणि CCTV फुटेज देता येत नाही म्हणून सांगितले. त्यामुळे फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहे त्याकडे लक्ष द्यावे असा टोला लगावला. सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काम करायला अडचण निर्माण करत आहेत. भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. म्हणून लोकशाहीचे चौथा स्तंभ असलेले पत्रकारांनी यांना उघडे पाडावे. तसेच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर झाले पाहिजेत.
सोलापूर शहरात गेल्या बारा वर्षापूर्वी विमानसेवा सुरू होती. भाजपच्या काळात बंद पडली. गेली अकरा वर्षे देशात राज्यात भाजपची सत्ता असून सुद्धा विमानसेवा का सुरू होऊ शकले नाही याचे उत्तर कोणीच देत नाही. काल सर्वांच्या प्रयत्नाने विमानसेवा सुरू झाली त्याचे स्वागत करते पण गोव्याला विमानसेवा सुरू करून कोणते उद्योग येणार आहेत. विमानसेवाच सुरू करायची असेल तर सोलापूर ते मुंबई, तिरुपती, बंगलोर, हैदराबाद, पुणे विमानसेवा सुरू करा त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास, प्रगती होईल. टेक्सटाइल, गारमेंट उद्योग, IT, इतर उद्योग सोलापूरात वाढीस लागतील, नवीन उद्योग येतील.
ऑपरेशन सिंदुर बाबत प्रचारसभेत मोठमोठ्ठे फिल्मी डायलॉग मरणारे मोदीजी ऑपरेशन सिंदुर ची माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवीत आहेत. व्यापाराची धमकी देऊन सीजफायर मी करायचे लावले म्हणून आतापर्यंत अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत बारा वेळा जाहीरपणे सांगितले त्यावर मोदी मूग गिळून गप्प आहेत. यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमकुवत होत आहे. जनतेची आणि विरोधी पक्षाची मागणी आहे की संसदेत येऊन देशातल्या लोकांना याची माहिती द्यावी ते येत नाही आणि माहिती देत नाहीत. भारताचा विजय का घोषित केला नाही. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदुर संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी करत आहोत. १९७१ साली कणखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांना इंदिरा गांधींनी झुकवले होते. फ्रान्सने राफेलचे तंत्रज्ञान भारताला दिले नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तानला अगोदरच सांगतो की आम्ही पाकिस्तानच्या तळावर हल्ला करणार यामुळे पाकिस्तान सावध झाला. त्यामुळे आपल्या सैन्यदलाचे नुकसान झाले. अनेक जवान शहीद झाले. त्यांना शहिदांचा दर्जा दिला नाही. आतंकवादी हल्ला केलेले चार आतंकवादी अजून फरार आहेत ते का पकडले गेले नाहीत मोदी सरकारच्या अश्या कारभारामुळे भारत जगात कमकुवत आहे हे दिसून येत आहे.
तळागाळातील लोक आमच्यासोबत असून काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. गेल्या अकरा वर्षातील भाजपचा अपयशी कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न याबाबत जनजागृती कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच सुरू करणार आहोत.
तसेच यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनीही पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख मतदान झाले आहे, अशी कबुली निवडणूक आयोगाने दिली आहे. EVM घोटाळ्या प्रमाणे हाही एक घोटाळा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही परिस्थिती पुन्हा होऊ नये, याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी.
या पत्रकार परिषदेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगड्डी, मा. विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, मा. नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते नागनाथ कदम, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, दिनेश म्हेत्रे, संजय गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments