आज मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांची पंढरपूर येथील धनगर समाजाचे शिष्टमंडळाने भेट घेतली व पंढरपूर शहरातील नव्याने मंजूर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनांच्या भुमीपुजन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित शोषित पिडीत बहुजनांचे कैवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यंदा आषाढी एकादशी निमित्त महापुजेसाठी दि.५जुले रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी येत आहेत व एकादशी दिवशी पण फडणवीस यांचा दौरा असणार आहे गेले अनेक वर्षे पंढरपूर शहरात अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सांस्कृतिक भवन व्हावे ही मागणी होती महायुतीच्या सरकार ने या भवनाला जागा उपलब्ध करुन तिन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या कामाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून हे भवन व्हावे म्हणून माऊली हळणवर यांचे नेतृत्व खाली समाज बांधवांनी आंदोलन केले होते व पाठपुरावा ही केला होता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थित राहून अहिल्या देवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षांमध्ये सन्मान करावा अशी विनंती शिष्टमंडळाने केली यामध्ये माऊली भाऊ हळणवर ,पंकज देवकते ,प्रशांत घोडके लिगंराज शेंडगे,अक्षय बोरकर उपस्थित होते यावेळी मंत्री महोदयांनी नक्कीच मुख्यमंत्री महोदयांना वेळ देण्याची विनंती करतो असे आश्वासन दिले....
0 Comments